Posted by : achhiduniya 10 May 2018


[प्रतीकात्मक चित्र ]
 नागपुर :- समाजाकडून उपेक्षित राहिलेल्या अनाथ मतीमंदांच्या पुनर्वसनासाठी सातत्याने धडपणाऱ्या महात्मा गांधी विकलांग केंद्राच्या माध्यमातून 138 बहुविकलांग व मतीमंद मुलांचा सांभाळ करताना या बालगोपालाच्या सहाय्याने सातपुडाच्या पायथ्याशी असलेल्या वझ्झर येथील उजाड टेकडीवर नंदनवन फुलविण्याच्या राज्यातील पहिला प्रयोग शंकरबाबा पापडकर यांनी यशस्वी केला आहे परंतु तिव्र उन्हाळयातही लावलेले झाडे जगविण्यासाठी मतीमंद मुलांनी प्लॉस्टिक कॅनचा ड्रिप सिंचनाचा वापर हा वृक्ष संवर्धनासाठी आदर्श ठरला आहेमेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या वझ्झर या गावात बहुविकलांग, मतीमंदी आणि अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी महात्मा गांधी विकलांग व पुनर्वसन केंद्र शंकरबाबा पापडकर यांनी सुरु केले आहे अंबादासपंथ वैद्य विकलांग बेवारस बालगृहाच्या माध्यमातून राज्यात बेवारस सापडलेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारी या संस्थेने स्विकारली आहेअनाथ मतीमंदाचे, बहुविकलांगाचे पालनपोषणासोबतच त्यांच्या पुनर्वसनाचे काम या संस्थेमार्फत चालविल्या जातेअशा मुलांच्या पुनर्वसनाचा अभिनव प्रयोग शंकरबाबा पापडकर यांनी सुरु केला आहे अनाथ मतीमंद मुलांची पुनर्वसन करताना त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमता ओळखून ही मुले केवळ वृक्षारोपण व संवर्धन करु शकतात 
[प्रतीकात्मक चित्र ]
त्यामुळे उजाड असलेल्या टेकडीवर वृक्षारोपण करुन अशा मुलांच्या सहाय्याने वृक्ष संवर्धनाचे कार्य सुरु करण्यात आले मतीमंदांनी वृक्षारोपण करुन ती जगविण्याचा बहुदा राज्यातील पहिला प्रयोग सुरु करण्यात आला हा प्रयोग यशस्वी करताना तिव्र उन्हाळयातही लावलेले वृक्ष जगविण्याचा प्रयत्न होत असताना रिकाम्या प्लॉस्टिक कॅनचा वापर झाडे गजविण्यासाठी सुध्दा होवू शकतो हे ओळखून झाडाच्या बुंद्याशेजारी प्लॉस्टिक कॅन ठेवून झाडाच्या मुळापर्यंत पाण्याचे थेंब पोहचतील अशा पध्दतीने प्लॉस्टिक कॅनचा वापर ड्रिप सिंचनासारखाच करण्यात आला मतीमंद मुले सकाळी व सायंकाळी प्लॉस्टिक कॅन पाण्याने भरतात. ड्रिपच्या सहाय्याने दिवसभर झाडांना पाणी मिळत असल्यामुळे उन्हाळयात ही झाडे जीवंत ठेवण्यासोबतच संपूर्ण माळरान हिरवे झाले आहे या अभिनव प्रयोगामुळे सुमारे तीन हजार वृक्ष मतीमंद मुलांनी जगविली आहेअनाथ मतीमंद तसेच बहुविकलांग मुलांची संगोपन करताना त्यांच्या पुनर्वसनाला सातत्याने प्रयत्नशिल असलेल्या शंकरबाबा पापडकरांनी अंध, अपंग मुलांना शिक्षण देवून त्यांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिलेपरंतु मतीमंद असलेल्या मुलांना वृक्षारोपणा सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्या क्षमता वाढविण्याचा प्रयत्न सुरु केला1992 पासून सुरु केलेला या उपक्रमामुळे 15 हजार विविध प्रजातीची वृक्ष लावून त्यांचे संगोपन केले 80 अनाथ मतीमंद मुलांसोबत सकाळी 6 पासूनच वृक्षरोपण आणि संगोपनाला सुरुवात करतात यामुळे मुलांच्या बौध्दीक आणि शारिरीक विकासाला चालना मिळते
अशा प्रकारचा यशस्वी प्रयोग शंकरबाबा पापडकरांनी राबविला आहेमेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या या टेकडयांच्या परिसरात पाण्याची सुविधा निमार्ण करण्यासाठी दोन विहिरी खोदण्यात आल्या तसेच विंधन विहिरीला पाणी लागल्ययामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्नतर सुटलाच त्यासोबत वृक्षारोपण मोहिमेला सुध्दा चालना मिळाली. प्रत्येक झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोहचेल अशा पध्दतीने व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळयात पाणी टंचाई या दृष्टीने माथा ते पायथा या तत्त्वानुसार पावसाचे पाणी अडविण्यासाठी दगडांचा वापर करण्यात आला त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी सहज उपलब्ध झाले. आतापर्यंत चिक्कू, डाळिंब, आवळा, फणस, आंबा, बोर, सिताफळ त्यासोबत कडुनिम, सागवन, सालई, बिबा, रक्तचंदन, बांबू, मोहा, रिठा, कडई आदी सुमारे 15 हजारपेक्षा जास्त झाडे अनाथ मतीमंद मुलांनी जगविली आहेयावर्षीच्या तिव्र उन्हात विविध प्रजातीची झाडे जगविण्यासाठी प्लॉस्टिक रिकाम्या कॅनचा वापर करण्यात आला साधारणता तीन ते पाच लिटरच्या कॅन ड्रिपसाठी वापरल्यामुळे 3 हजार वृक्षांचे संवर्धन झाले आहे शंकरबाबा पापडकर यांनी अनाथ मतीमंदाच्या पुनर्वसनासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन हा अभिनव मार्ग निवडला आणि यशस्वी करुन दाखविला आहे अशा प्रकारचा प्रकल्प इतरांसाठी सुध्दा प्रेरणा तसेच मार्गदर्शक निश्चितच ठरणार आहे
जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर मो.9890157788

Leave a Reply

Subscribe to Posts | Subscribe to Comments

Translate

Business Advertise T.B

Commercial Adv T.B.

Today's IMP News Headline’s {सुर्खियां }

@ नोएडा में हिंसा के बाद पुलिस हाई अलर्ट पर, 8 मई तक पूरे जिले में धारा 163 लागू, ड्रोन और सीसीटीवी से निगरानी।@ बंगाल के 77 पोलिंग बूथ पर दोबारा हो सकती है वोटिंग, शिकायतों को देखते हुए चुनाव आयोग करेगा फैसला।@ जबलपुर में डूबा क्रूज, 4 यात्रियों की मौत, 15 ने तैरकर बचाई जान, 29 थे सवार।@ Exit Poll: बंगाल में BJP+ की बन रही है सरकार, TMC को 100 सीटें मिलने का अनुमान।@ DEO BEO समेत 3 शिक्षा अधिकारी गिरफ्तार- बरगढ़ शर्मसार, महिला शिक्षिका से यौन उत्पीड़न का आरोप।@ भारत-इटली मिलकर बनाएंगे सैन्य हार्डवेयर, रक्षा औद्योगिक ढांचा विकसित करने का लिया संकल्प।@ बंगाल में केंद्र सरकार ने पूरी मशीनरी ही लगा दी थी,चुनाव के बाद ममता बनर्जी का आया पहला रिएक्शन।@ मुस्लिम बच्ची को मिले हिंदू माता-पिता, कोर्ट के फैसले ने बताया- प्यार कभी धर्म नहीं देखता।@ ओडिशा के ढेंकानाल में महिला से दुष्कर्म, हमला कर चेहरा बिगाड़ा-एंबुलेंस नहीं मिली तो ऐसे पहुंचाया अस्पताल।@ तमन्ना भाटिया विवाद के बीच मैसूर सैंडल की रिकॉर्ड कमाई, टर्नओवर ₹2,016 करोड़ के पार। @ ऑपरेशन सिंदूर को भारत ने अपनी शर्तों पर रोका था, लंबी लड़ाई के लिए भी तैयार थे- राजनाथ सिंह।@ गाजा के टेंटों में चूहों का तांडव-सोते हुए बच्चों को काट रहे चूहे, 20 लाख विस्थापित खतरे में।@ ट्रंप की हत्या की साजिश: गाला डिनर से पहले आरोपी ने हथियारों के साथ ली थी सेल्फी, कोर्ट में बड़ा खुलासा।@ कश्मीर में 37 साल बाद बारामूला के ऐतिहासिक गणेश मंदिर में गूंजा शंखनाद, खुशी से नम हुई कश्मीरी पंडितों की आंखें।@ बुक्स ड्रेस कहीं से भी खरीदने की आजादी, उल्लंघन पर सख्त एक्शन,स्कूलों को सीएम रेखा गुप्ता की चेतावनी।

Social Adv C.B.

अन्य खबरों के लिए हमारे सहयोगी मीडिया संस्थान पर विजिट करें। https://aniltvnews.blogspot.com

Advertise Section C.B.

Important....Video

"सिंधी छेज़ नृत्य श्रीराम नवमी शोभायात्रा के दौरान"

होनहार काबिल युवाओ के लिए {JOB Corner} नौकरी विभाग

जल्द ही नए रोजगार की संधि उपलब्ध होगी।

Business Adv M.B.

Common Advertise M.B.

Govt's green signal to CSR fund spending for 'Har Ghar Tiranga' campaign“दुनिया मे भारत की पहचान-आन-बान-शान-जान.....“तिरंगा” “गर्व करे भारतीय होने पर”

जीवन सवारें सुविचार

@ हम बहुत व्याकुल,गुस्सैल और आत्मकेंद्रित हो रहे हैं। दूसरों के प्रति सहयोग और जीवन के प्रति आस्था को मजबूत कीजिए। प्रेम,अनुराग और सहृदयता जीवन मूल्य हैं। इनको केवल शब्द समझने से बचना होगा। @जिस किसी चीज से जीवन में प्रेम छूटता जाता है, समय और स्नेह छूटता जाता है। वह बासी होती जाती है। हमारी जिंदगी में बासी होते रिश्ते इसकी गवाही दे रहे हैं। जिंदगी को प्रेम की धूप,थोड़ा इत्मिनान दीजिए।@ ऐसी आंखें जिनके सपने की सीमा सीमित होती है,वह अपने जीवन को विस्तार नहीं दे पातीं। अपने साथ थोड़ा दूसरों के लिए सोचना जिंदगी को सुकून,आनंद और सुख देता है।

Common Advertise B.B.

Common Advertise B.B

Flash Back Important News

Request Massage

मित्रो प्रणाम.....यदि आपके पास कोई लेख,प्रेरक कहानियॉ, सकारात्मक विचार,अद्भुत जानकारी या किसी व्यक्ति विशेष की खास उपलब्धि कि जानकारी है,जो आप हमसे और हमारे मित्रो के साथ सांझा करना चाहते हैं,तो क्रप्या उसे अपनी फोटो के साथ हिन्दी में हमे E-mail करें।हमारी Id:- achhiduniya@gmail.com जरूरत के मुताबिक उसमे कुछ परिवर्तन करने या सम्पूर्ण करने की जरूरत पड़ने पर त्रुटी मुक्त करके हम आपके नाम और फोटो के साथ हमारे अच्छी दुनिया न्यूज पोर्टल पर प्रकाशित करेंगे।

- Copyright © AchhiDuniya Online Electronic Media News Portal & E-Paper -KevoxTech- Powered by KevoxTech - Designed by AchhiDuniya -