- Back to Home »
- State News »
- बुद्धांचा विचार विज्ञानाधारित असल्याने त्याचा जगभर प्रसार.....केंद्रीय सामाजिक त्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन
बुद्धांचा विचार विज्ञानाधारित असल्याने त्याचा जगभर प्रसार.....केंद्रीय सामाजिक त्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन
Posted by : achhiduniya
17 October 2018
नागपुर: बुद्धविचार हे विज्ञानाधारित असल्याने त्याचा स्वीकार जगातील अनेक राष्ट्रांनी केला व त्याचा प्रसार विश्वभरात झाला, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले. नागपूरमध्ये कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात आयोजित चतुर्थ आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट शांतता परिषदेचे उद्घाटन त्यांच्या विशेष उपस्थितीत झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, परिषदेचे उद्घाटक लेह लद्दाख येथील आंतरराष्ट्रीय महाबोधी मेडीटेशन सेंटरचे संचालक भदन्त संघसेना व अध्यक्षस्थानी बुद्धगया येथील महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष भदन्त डॉ. वरसंबोधी व राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाच्या सदस्या व ड्रॅगन पॅलेसच्या संस्थापिका अॅड. सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
आज जगात अस्थिरता व अशांतता असतांना बुद्धांचे क्रांतीकडून शांतीकडे, हिंसेकडून अहिंसेकडे व दु:खाकडून दु:खनिवारणाकडे नेणारे तत्वज्ञान महत्वाचे ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरात या बुद्धधम्माची दीक्षा लाखो अनुयायांना दिली, असे विचार आठवले यांनी यावेळी मांडले.ड्रॅगन पॅलेस येथे गत 4 वर्षापासून आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट शांतता परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. जगातील ज्या देशांनी तथागत गौतम बुद्धांचा शांती व मैत्रीचा विचार स्वीकारला, त्या देशातील प्रतिनिधींना या परिषदेत आमंत्रित करून चिंतन व विचार मंथन करणे,
हा या परिषदेचा उद्देश असल्याचे अॅड. सुलेखा कुंभारे यांनी यावेळी सांगितले परिषदेच्या उद्घाटन सत्रानंतर ‘जागतिक शांती,मैत्री व मानव कल्याण करिता बौद्ध धम्माची आवश्यकता’ या विषयावर एका परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटन समारंभात जपान, श्रीलंका, म्यानमार, व्हिएतनाम,तिबेट, नेदरलँड,थायलँड या देशातील भिक्खूसंघाचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.